हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. आज कल गधे भी गुलाब मांगते है और चोर उच्चके इन्साफ मांगते है, जिन्होने लुटा है पचास साल हमको वो दो साल मे हिसाब मांगते है. अशी कविता देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोलीतल्या कार्यक्रमात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे मी कोणत्या नेत्याबद्दल म्हणत नाही, फक्त कविता म्हणत आहे असं स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, वेळ आली की त्या बाहेर काढू असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वक्तव्यावरुनही वाद झाला होता. मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.