ठाणे : घोडबंदर परिसरातल्या नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे दिलाय. पिण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यानेमुळे हा निर्णय देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घोडबंदर परिसरातील नवीन बांधकामांना परवानगी देऊ नका असे स्पष्ट आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिले आहेत. लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 


मंगेश शेलार यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना, पिण्याचं पाणी ही प्राथमिक गरज असल्याचं सांगत, न्यायालयानं हे आदेश दिले.