यवतमाळ : दारुड्या पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा विळ्याने निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा इथं घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी दारुड्या पतिला पोलिसांनी अटक केली असली तरी घटनेच्या दिवशीच पत्नीनं पतिकडून जीवाला धोका असल्याची फिर्याद नोंदवली होती, पण पोलिसांनी वेळीच कारवाई नं केल्याने पत्नी वंदना चव्हाण हिचा बळी गेला असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केलाय.


वंदनाच्या मृतदेहासह ग्रामस्थानी पोलीस ठाण्यावर धडक देत आपला रोष व्यक्त केला.. चव्हाण दाम्पत्य गेल्या दोन वर्षांपासून रोजगारानिमित्त पुणे इथं वास्तव्यास होते.


 मात्र पतीच्या दारुव्यसनाला आणि संशयी वृत्तीला कंटाळून वंदना चिल्ली इथं चारच दिवसांपूर्वी आली होती. तिच्या मागोमाग आलेल्या आरोपी कैलासने डाव साधून तिची हत्या केली.