पुणे : घरात पाणी नाही म्हणून पुण्यातील पोलीस कुटुंबियांनाच अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये मागील १५ दिवसांपासून पाण्याचा प्रश्न आहे. त्याचा संताप त्यांनी रास्ता रोको करून व्यक्त केला. 


मॉडर्न कॉलेजसमोर त्यांनी जवळजवळ पाऊण तास ठिय्या दिला होता. विशेष म्हणजे इथल्या रहिवाशांनी गेल्या वर्षी देखील याच कारणासाठी आंदोलन केलं होतं.


मात्र, महापालिका प्रशासनाकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळालं नाही. स्मार्ट शहर होऊ घातलेल्या पुण्यातील पोलीस लाईनची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय कथा सांगावी.