रत्नागिरी : शहरात पऱ्याची आळी येथे मुस्लिम अपंग तरूणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही व्यक्ती जेवण करण्यासाठी मेसमध्ये जात असतना एका बुरखाधारी हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर स्थानिकांनी हल्लेखोराचा पाटलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोराचनं बंदुकीचा धाक दाखवत स्वत:ची सुटका करुन घेतली.


रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बाजारपेठेतही नागरिकांची फारशी वर्दळ नसल्याने बाजारपेठ लवकरच बंद होत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य भागातही लवकर सामसूम होताना दिसते. याचाच फायदा हल्लेखोरांने घेतला. या घटनेत हल्ला झालेली व्यक्ती जागीच मृत्यूमुखी पडली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली. पोलीस हल्लेखोराचा शोध करत आहेत.