मुंबई : नेममीच वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या लवासाला राज्य सरकारनं जोरदार दणका दिलाय. लवासाचा विशेष दर्जा काढून घेण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास खात्यानं हा निर्णय घेतलाय. लवासा आता पीएमआरडीएच्या अखत्यारीत असणार आहे. त्यामुळे लवासाला यापुढं विशेष सवलतींच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे.