मुंबई : दुष्काळानं त्रस्त झालेल्या राज्यातल्या जनतेला दिलासा देणारी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. यंदा राज्यात मान्सून लवकर धडकण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यापासून हवामान सामान्य असून पूर्व किमा-यावर एकही वादळ आलेलं नाही. त्यामुळं तापमान चांगलं असून त्याचा मान्सूनवर परिणाम होणार आहे. त्यामुळंच मान्सूनचं आगमन लवकर होण्याची चिन्ह आहेत.


यंदा 30 मे पर्यंत मान्सून राज्यात धडकण्याची चिन्ह असल्याची शक्यता कृषी हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.