अकोला : आतापर्यंत काम न करणा-या आधिकार्यांविरोधातील 'मारो आंदोलन' आता काही मंत्र्यांच्या विरोधात करावे लागेल, असा इशारा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 


ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील चार-पाच मंत्री अतिशय बदमाश असून पैशांशिवाय काम करीत नाहीत, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय. या मंत्र्यांचा लवकरच हिशेब करू असा इशारा दिलाय.