औरंगाबाद : मराठवाड्यातील बीअर कंपन्यांना पाणी द्यायचे की पीण्यासाठी पाणी द्यायचे याचा प्राधान्य क्रम सरकारने ठरवावा असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंना लगावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून खासदार सुप्रिया सुळे या मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर असा दोन दिवसांचा त्यांचा दौरा आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला. 


पाच जिल्हयातील शेतक-यांशी  सुप्रिया सुळे या संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर विविध प्रकल्पांची पाहाणीही त्या करतील.