मुंबई : खंडाळा बोर घाटात अपघात झाल्यामुळं मुंबईकडं येणारी वाहतूक खोळंबली होती. ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येतेय. अमृतांजन पुलाजवळ झालेल्या अपघातामुळं तीनपैकी एकच लेन वाहतुकीसाठी सुरू होती. दोन तासांनंतर आता तिन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या झाल्या असून वाहतूक पूर्वपदावर येत आहे.