कराड : राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा सागर असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गमतीनं म्हटलंय. कराडच्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात त्यांच्या हस्ते ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिक्षणसाठी खर्च झाला असला तरी संपूर्ण आयुष्य पैसे कमविण्यासाठी घालवू नका, असा सल्ला त्यांनी दिला.


पैसा, साधन-संपत्ती आणि सत्ता असूनही अनेक लोक असमाधानी असल्याचं पाहतोय. हे सांगताना गडकरींनी आपल्या खास शैलीत राजकारणातल्या असमाधानी मानसिकतेचा उहापोह केला.