औरंगाबाद : पासपोर्टसाठी औरंगाबादकरांना मुंबईत मारावे लागणारे खेटे आता बंद होणार आहेत. शहरात पाहणीसाठी आलेल्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिका-यांनी छावणीतील पोस्ट ऑफिसात कार्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीला औरंगाबादकरांना पासपोर्ट कार्यालयाची भेट मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्यस्थितीला नागरिकांना कागदपत्रे आणि मुलाखतीसाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागतात. मात्र आता या निर्णयामुळे औरंगाबाद आणि बीडच्या नागरिकांची सुटका होणार आहे. या कार्यलयाच्या स्थापनेसाठी औरंगाबादमधील दोन जागांची पाहणी करण्यात आली होती. गारखेडा मार्गावरील रिलायन्स मॉलवरील जागा आणि त्यानंतर छावणीतील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली.