डोंबिवली : भाजपला निवडून दिलयं भोगा आता कर्माची फळं अशा शब्दांत राज ठाकरेंनी डोंबिवलीकरांना फटकारलं. गेल्यावर्षी डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीतील स्फोटमध्ये अनेक नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं, अदयापही ही नुकसानभरपाई न मिळाल्याने नुकसानग्रस्तांच्या शिष्टमंडळाने राज यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी मनसेला निवडून न देता भाजपला निवडून दिल्याचा त्रागा व्यक्त त्यांनी नागरिकांना फटकारलं. मुंख्यमत्री हे थापामंत्री आहेत मात्र आपण हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडू असं आश्वासनही त्यांनी दिलं. एका खासगी कार्यक्रमासाठी राज ठाकरे रविवारी डोंबिवलीत आले होते.