बारामती : राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्वच पक्ष आक्रमक झालेत. भाजपचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनीही आक्रमक भूमिका घेतलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफी केली नाही तर भाजप सरकारला घालवायला आघाडी सरकारला एवढा वेळ लागणार नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी योग्य वेळी बाहेर पडणार असल्याचे संकेतही त्यांनी बारामतीत दिले.


नेहमीच विरोधक शेतक-यांसाठी असतात. त्याचप्रमाणे आताचे मुख्यमंत्री विरोधात असताना कापसाला ५ हजार भाव द्यावा म्हणायचे. आता ते एक शब्दही बोलत नाहीत. आम्ही सत्तेत असलो तरी शेतक-यांसाठी लढत राहणार आहोत. बच्चू कडूंनी काढलेल्या आसूड यात्रेवर वडनेरमध्ये पोलिसांनी लाठी चार्ज करणं योग्य नाही असं म्हणत त्यांनी आसुड यात्रेचं समर्थन केलं.