मुंबई : शेतक-यांच्या विविध मुद्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांनाही धारेवर धरलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला पक्ष सत्तेत असला तरी सरकारचा आपण ठेका घेतलेला नाही. सरकारचा उदो उदो करू नये असं सांगत आपल्या मर्यादित मंत्रिपदाचा विचार करून भूमिका घेण्याचा सल्ला त्यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिला. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातून कांदा आयात केल्यामुळंच आपला शेतकरी अडचणीत आल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केलाय.