नाशिक : शेतकऱ्यांच्या नादी लागलात तर तुमची सत्ता जाईल असा घरचा आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची शिवडे गावात राजू शेट्टी यांची सभा घेण्यात आली. यावेळी भूसंपादनाच्या विरोधात दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करुन लढा उभारणार असल्याचे राजू शेट्टींनी स्पष्ट केलं.


यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण यांच्यावरही तोंडसुख घेतलं आणि प्रशासनानं जमिनीसाठी बळजबरी करु नये असं आवाहन केलं. याच प्रकरणामुळे १५ वर्ष असलेली आघाडी सरकारची सत्ता गेली, त्यामुळे यापासून सरकारने बोध घ्यावा, असंही शेट्टी यांनी म्हटलंय.