पुणे : स्वाभिमानीच्या जिल्हा परिषद पराभवाच्या चिंतन बैठकीला सदाभाऊ खोतांची दांडी मारली आहे. पुण्यात असूनही सदाभाऊ खोत या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी थांबलेल्या सर्किट हाऊसला सदाभाऊ खोत यांचं बुकिंग होतं, मात्र असं असूनही सदाभाऊ खोत यांनी या सर्किट हाऊसला येऊन थांबण टाळलंय. त्यामुळे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातला वाद विकोपाला गेला असल्याच यानिमित्ताने समोर आलंय.


राजू शेट्टी यांनी मात्र खोत यांची बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बजेट अधिवेशन असल्यामुळे सदाभाऊंना काम आहे. पुण्यात असले तरी त्यांना शासकीय बैठका होत्या, म्हणून पक्षाच्या बैठकीला ते आले नाहीत असं शेट्टी म्हणाले. लवकरच आम्ही दोघे एकत्र दिसू असा विश्वासही शेट्टींनी व्यक्त केला आहे.