कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाकयुद्ध काही थांबण्याची चिन्हं नाहीत. 'बगलबच्चांना लगाम घाला अन्यथा बंदोबस्त करु असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिल्यानंतर राजू शेट्टींनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बगलबच्चे वगैरे असे प्रकार प्रस्थापितांमध्ये असतात, आपला पक्ष चळवळीतून आला असल्याचा पलटवार शेट्टींनी केला आहे. सदाभाऊंसोबत कुठलाही वाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकृतीच्या कारणामुळे सदाभाऊ आत्मक्लेष यात्रेत सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता असल्याचे ते म्हणालेत. शिवाय सदाभाऊ खोत कुठे कमी पडतायत का याचा विचार आत्मक्लेष यात्रेनंतर करु असंही शेट्टी म्हणाले. आपण मळलेल्या वाटेवर चालणारे नसून वेगळी वाट निर्माण करणारे आहोत असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं होतं. त्याला शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


पाहा व्हिडिओ