सिन्नर : उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप ठोक यांच्यावर लष्करी इतमामात संस्कार करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहीद संदीप ठोक यांना अंत्यत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण गावातील नागरिक भावुक झाले होते. 


"संदीप ठोक अमर रहे' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवानांना वीरमरण आले. यात महाराष्ट्रातील ४ जवानांचा समावेश आहे.