सोलापूर : राष्ट्रपती निवडणुकीत उभं राहण्याइतपत आपलं राजकीय बळ नसल्याची कबुली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. तसंच त्यांना नुकताच पदमभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल, सोलापूरवासीयांकडून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


भाजपला राष्ट्रपतीपद निवडणुकीत बहुमतासाठी फार कमी मतांची गरज असल्याचं सांगत, आपण या निवडणुकीसाठी इच्छूक नसल्याचा पुनरुच्चार शरद पवारांनी केलाय.


यावेळी बोलताना काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पक्षीय वैचारिक मतभेद बाजूला करुन हा राष्ट्रीय प्रश्न सोडवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काश्मीरमधल्या तरुण पिढीशी सुसंवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली तर हा प्रश्न सुटू शकेल, असं मतही त्यांनी या निमित्तानं मांडलं.