मुंबई : शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये रोज काही ना काही प्रकरणावरून वाद सुरु आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. या दोन्ही पक्षांमध्ये ही भांडणं सुरु असताना सत्तेमधली शिवसेना भाजपचा पाठिंबा काढून घेणार का असे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाकित केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल आणि हे सरकार अल्पमतात जाईल, असा अंदाज पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.