नवापूर : नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरात आज घडलेल्या घटेनेनं महाडच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा एकादा ताज्या होतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालन्याहून सुरतला निघालेली बस पुलावरून जाताना पुराच्या पाण्यात अडकली आणि सतरा प्रवाशांच्या हृदयाचा ठेका चुकला. 


पहाटे पाच वाजेच्या सुमारास नदीला पुर आल्याने पुलावरुन पाणी वाहत होतं.  पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बस चालकाने बस पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. बस अचानक पुलावर पुराच्या प्रवाहात बंद पडली. 


प्रवाशांनी प्रचंड आक्रोश केला. १०० नंबरवर कॉल केल्यावर तात्काळ मदत धावून आली. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी १७ प्रवाशांचे प्राण वाचवले. ेसीबीच्या सहाय्याने प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आलं.