प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  कोल्हापुरात आज शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या लग्नादरम्यान उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यामध्ये काही काळ गुप्तगु सुरू होतं. उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडे गुरुजी शेजारी शेजारी बसले होते. काही वेळनं जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या जवळ येवून बसले. त्यानंतर या दोघांही नेत्यामध्ये काही काळ संवाद सुरू झाला. 


राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे मुंबईचे पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळं या दोघांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या महापौराबाबत चर्चा झाली असावी असा तर्क राजकीय क्षेत्रात लावला जात आहे. पण या दोघांमध्ये नेमकं काय चर्चा झाली असावी हे मुंबई महानगरपालीकेच्या महापौर पदाच्या निवडीनंतरच स्पष्ट होईल.