अकोला : राज्यात जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याची जिल्हानिहाय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं ते अकोल्यात बोलत होते. यावेळी त्यांनी अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला. 


सर्वात आधी त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं. आमदार चाबुकस्वार यांचा विषय उगाच फुगावला गेल्याचा दावाही त्यांनी केला.  


ते म्हणाले. १९ मे रोजी नाशिक येथे शेतकऱ्यांचा आणि पदाधिका-यांचा मेळावासुद्धा आयोजित करण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले ..