उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे गेल्या हा दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे इथे नगर संचालक यांच्या कार्यालयात शहर विकास आराखड्याच्या एका बैठकीत जात असताना हा प्रकार घडलाय. खालापूर टोलनाक्यापाशी ते गाडीतून उतरले. मागून महापालिकेची गाडी येत आहे, त्यामुळे त्यांनी गाडी परत पाठवली. 


संध्याकाळी त्यांच्या मुलीने फोन केला असता अधिका-यांनी नगर रचनाकार पोहोचले नसल्याच सांगितलं. अखेर खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. 


करपे हे कोणत्यातरी तणावाखाली असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. मात्र हा तणाव कोणता होता याबाबत माहिती मिळालेली नाही.