रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले गावात पोहण्यासाठी गेलेले चौघे बुडाले त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्ले गावातील मुचकुंदी नदीवर हे चौघेही पोहण्यासाठी गेले होते पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघांचा बुडून मृत्यू झालाय...हे चौघेही गावातील एका लग्नाच्या शूटिंगसाठी मुंबईवरून सकाळीच कोर्ले गावात आले होते मात्र ग्रामस्थांनी यांना पोहायला जाऊ नका असे सांगून देखील हे चौघेजण पोहायला उतरले...


यातील मुकेश मकवाला आणि बंटू जाला या दोघांचा बुडून मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात यश आले. मृत पावलेले दोघेही मुंबई जोगेश्वरी येथील रहिवासी आहेत... विशेष म्हणजे हे चौघेही जीन्स पॅण्ट घालून पोहायला पाण्यात उतरले होते त्यामुळे त्यांना पाण्यातून वरती यायला खूप वेळ लागला आणि त्यामुळे यातील दोघांचा मृत्यू झालाय