मुंबई : युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठातल्या अनागोंदीविरोधात तक्रार केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले 15 महिने परीक्षा विभागाच्या प्रमुखांचं पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे  उपकुलगुरूपदीही नेमणूक झालेली नाही. मोर्चे, मुख्यमंत्र्यांची भेट याचा काहीही उपयोग झालेला नाही, म्हणून आज राज्यपालांकडे मागणी केल्याचं यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. 


दरम्यान, याविषयात राजकारण आणणंचं नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा विषय राज्यपालांकडे मांडल्याचंही आदित्य यावेळी म्हणाले