मुंबई : पाककलेवर आधारित अन्नपूर्णा या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगला बर्वे यांचे अन्नपूर्णा हे पुस्तक महिला वर्गामध्ये विशेष गाजले. त्यांच्या पश्चात मुली, जावई, नातवंडे आणि पंतवंडे असा परिवार आहे.


अन्नपूर्णासह मंगला बर्वे यांनी विवाहसोहळा व रुखवताचे पदार्थ, दिवाळी आणि सणासुदीचे पदार्थ, चायनीज पदार्थ, छंद लोकरीच्या विणकामाचा, उपवासाचे पदार्थ, डाळी-कडधान्य खासियत, रोटी-परोठे, पालेभाजी खासियत, पदार्थ सणवारांचे, न्याहारी आणि अल्पोपहार यासारख्या विषयांवर पुस्तके लिहिली.