मुंबई : राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ खडसेंनी मौन सोडलंय. मात्र त्यांनी स्वकीयांवरच वार केलाय. आपला आवाज दाबला गेला असून कोणताही पुरावा न देताच राजीनामा घेतला गेल्याचं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.


आपला आवाज कशाच्या आणि कुणाच्या जोरावर दाबला गेला याबाबत आताच बोलणार नसल्याचंही खडसेंनी नमूद केलंय. खडसे येवढ्यावरच थांबले नाहीत तर आपल्यामुळंच युती तुटली असून भाजपचा मुख्यमंत्री झाला, अन्यथा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता हेही सांगायला खडसे विसरले नाहीत. यामुळं मात्र खडसेंनी मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा अजूनही सोडलेली नाही.