मुंबई : भाजपचे मंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हे एक अध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे, घटनाघडल्यापासून ते झोपू शकले नाहीत, एवढे ते सतत कामात आहेत, असं भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम कदम यांनी असंही म्हटलंय की, प्रकाश मेहता यांनी आपल्या ३० वर्षाच्या कारकीर्दीत कोणावरही संताप केला नाही, शत्रूवरही प्रेम करणारे प्रकाश मेहता आहेत.


प्रकाश मेहता हे घटनास्थळी १६ तास उशीरा आले असं आपण म्हणत असले तरी, त्यांनी सर्वांशी संपर्क केला, जिल्हा पोलिस प्रमुख, डिझायस्टर मॅनेजमेंट त्यांनी घटनास्थळी लवकर दाखल करण्यासाठी प्रयत्न केले, असं राम कदम यांनी म्हटलंय.


एवढंच नाही तर घटना घडल्यापासून पालकमंत्री प्रकाश मेहता सतत कार्यशील आहेत, ते दोन दिवसापासून झोपलेले नाहीत, असंही भाजप आमदार राम कदम यांनी झी २४ तासच्या रोखठोक या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.