मुंबई : शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उपरती झाली आहे. आपल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंनी आपला माफीनामा सादर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दानवे आता नरमल्यासारखे माफी मागत आहेत, पण यानंतर तरी दानवेंच्या तोंडपट्ट्यांची धार उतरायला सुरूवात होईल, असं म्हटलं जात आहे.


शेतक-यांबाबत अपशब्द वापरला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शिवाय ३५ वर्ष शेतकऱ्यांच्या बाजूने राजकारणात असल्याचा उल्लेख दानवेंनी आपल्या माफीनाम्यात केला आहे. यावर रावसाहेब दानवे यांनी माफिनामाच सादर केला आहे.