मुंबई : मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रूळाच्या जॉईंट प्लेट्स लूज झाल्यामुळे वाहतूक 8.45 ते 9.02 पर्यंत बंद होती. काम पूर्ण झालं असलं तरी वाहतूक उशिराने सुरु आहे.


आठवड्याचा पहिलाच दिवस आणि ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा नेहमी खोळंबा होतो आणि प्रवाशांना मनस्ताप करण्यापलीकडे दुसरा काही पर्याय नसतो.