मुंबई : पोलिसांच्या कुटुंबियांच्या संतापाचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागलाय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले हवालदार विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी पोलीस वसाहतीत आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर बाहेर येताच वसाहतीतल्या रहिवाशांनी त्यांना घेराव घातला.. पोलिस सुरक्षित राहतील याची हमी द्या, अशी मागणी पोलिस-पत्नींनी केलीये. शिंदे यांच्या मृत्यूमुळे पोलीस वसाहतीमध्ये दुःख आणि संतापाची भावना आहे. 


कायदा सुव्यवस्था राखणारे पोलिसच सुरक्षित नसतील, तर सामान्यांचं काय अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय.