मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोरेगावच्या भाजप संकल्प मेळाव्यात भाषण करत होते, तेव्हा ते सलग बोलत होते, त्यांचे सलग आरोप शिवसेनेवर सुरू होते, नेहमीपेक्षा मुख्यमंत्री आज भाषणात जास्त जोर देताना दिसले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात मुख्यमंत्र्यांचा आवाज बसत होता, मात्र तरीही मुख्यमंत्री आपली भूमिका पटवण्यात लागले होते, तेव्हा जास्तच आवाज बसल्याने मुख्यमंत्र्यांनी काही सेकंद थांबवून पाणी घेतलं, आणि म्हणाले, 'आज पाणी पितोय, २१ तारखेला पाणी पाजणार आहे'.


'आज पाणी पितोय, २१ तारखेला पाणी पाजणार आहे', हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य २१ तारखेला सिद्ध होतं किंवा नाही हे २१ तारखेला दिसणार आहे.