मुंबई :  शहरात 8 एप्रिलप्रर्यंत 10 टक्के पाणीकपात असणार आहे. 25 मार्चपासून ते 8 एप्रिल दरम्यान ही पाणीकपात असेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंदवली-कापूरबावडी-भांडुपच्या जलबोगद्यावर झडपा बसविण्यात येणार असल्याने मुंबईत २५ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल विभागाने केले आहे. 


कापूरबावडी ते भांडुप संकुल येथे महापालिकेच्यावतीने जलबोगद्यावर झडपा बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कुलाबा, गिरगाव, भायखळा, दादर, माहीम तसेच वांद्रेपासून दहिसरपर्यंत तर कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूर, भांडुप विभागात दहा टक्के पाणीकपात असणार आहे.