मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका २०१७ च्या सुरुवातीला होत आहेत.


 आरक्षण असे असणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सर्वसाधारण प्रवर्ग महिला - रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सातारा, सोलापूर, लातूर, वाशीम,


- सर्वसाधारण प्रवर्ग - जालना, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली


- अनुसूचित जाती - भंडारा, अमरावती


- अनुसूचित जाती महिला राखीव - हिंगोली, नागपूर


- अनुसुचित जमाती महिला - नंदूरबार ,ठाणे, गोंदिया,


- अनुसूचित जमाती - वर्धा, पालघर


- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) -अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे


- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) - जळगांव, बुलडाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ


तसेच यापैकी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम यांची आरक्षणे या जूनपासून लागू होणार आहे. आणि पालघरचे जुलै २०१७ पासून तर भंडारा, गोंदिया चे डिसेंबर २०१७ पासून लागू होणार आहे. इतर जिल्ह्यांचे २०१७ मार्चमध्ये निवडणूक झाल्यानंतर होणार आहे.