दीपक भातुसे, मुंबई : विधानसभेत शालेय पोषण आहार साहित्य वितरण घोटाळ्याची लक्षवेधी सुरू असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 'हे कसलं सरकार' असा सवाल करत पुन्हा एकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शालेय पोषण आहार साहित्य वितरणाच्या व्यवहारांची व्यवहांरांची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करू, असं विनोद तावडे यांनी याबाबतच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितले. मात्र, तावडे यांच्या या विधानावर एकनाथ खडसेंनी आक्षेप घेतला. 'तुम्ही मंत्री आहात, मग शिफारस कशी करता... एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांकडे शिफारस करू म्हणतो हे चुकीचे आहे... हे कसलं सरकार?' असा थेट सवाल खडसेंनी तावडेंना केला. 


तुम्ही शिफारस न करता एसआयटी चौकशीची घोषणा करा, अशी मागणीही खडसे यांनी यावेळी बोलताना केली. शालेय पोषण आहार साहित्य पुरवण्यासाठी ठराविक ठेकदारांनाच काम कसे मिळते? तेच तेच ठेकेदार भाग्यवान कसे ठरतात? असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. ठेकेदार मुलांच्या जीवाशी खेळत असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही खडसे यांनी केली होती. पोलिसांना पुरावे देऊनही गुन्हे दाखल न करण्याचे कारण काय? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.