मुंबई : राज्यामध्ये फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळपास रोजच कुरबुरी सुरु आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये युती तुटल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये वाद आणखी वाढले आहेत. त्यामुळे शिवसेना आता सत्तेतून बाहेर पडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच प्रश्नाचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक उत्तर दिलं आहे. 


फडणवीस सरकार हे नोटीस पिरेडवर असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. झी 24 तासच्या रोखठोक या विशेष कार्यक्रमात संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.