मुंबई : सांगलीतील शेतकरी विजय जाधव हे शेतकरी संघर्षाची अंत्ययात्रा घेऊन थेट मुंबईत धडकलेत. विविध राजकीय नेत्यांना भेटून शेतकऱयांच्या व्यथा मांडल्यानंतर, उद्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'वर्षा'बाहेर या प्रतिकात्मक अंत्ययात्रेवर अंत्यसंस्कार करण्याचा जाधव यांचा विचार आहे.  


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाधव यांनी  'मातोश्री' गाठली, याप्रसंगी ग्रामीण भागातील शेतकऱयांच्या आत्महत्यांबाबत बोलत असताना जाधव यांना स्वतःचे अश्रू आवरणं कठीण बनलं.