मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने आराखडा मंजूर केला असून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात आली आहे. या आराखड्यावर मुख्यमंत्री अंतिम शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. 


नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील इमारतींबाबतचा हा आराखडा आहे. या आराखड्यानुसार बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना प्रत्येकी ५०० चौरस फुटांचं घर मिळणार आहे. 'म्हाडा'मार्फत या चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.


वरळी बीडीडीबद्दल अद्याप निर्णय नाही


वरळीबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही, काही कायदेशीर अडचणी असून शिवड़ी बीडीडी चाळीची जागा बीपीटीची असल्यामुळं याबाबत बीपीटी निर्णय घेणार आहे.