मुंबई : शहर आणि परिसर तसेच ठाणे, नवी मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस पडला. रात्री बरसणाऱ्या पावसानंतर आता मुंबापुरीतला पाऊस थांबलाय. पण रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० मिनिटेउशिरानं सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पाऊस ओसरल्यान काहीसा दिलासा मिळाला आहे. पण दिवसभरात मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय आहे. काल सकाळी साडे आठ ते आज पहाटे साडे पाचपर्यंत कुलाब्यात ६९ मिलीमीटर तर सांताक्रुझमध्ये १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 


रेल्वे ट्रकवर पाणी


मुंबईत पावसानं जोरदार कमबॅक केलंय. आज सकाळपासून कुर्ल्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे मात्र मुंबईतील सखल भागात पाणी भरलं. कुर्ला लोकमान्य टिळक नगर रोडला तर नदीचं स्वरूप आलं होतं. शाळेत जाणारे विध्यार्थी तसंच बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांना या संकटाचा सामना करावा लागला. रेल्वे कॉलनीत मोठ्या प्रमाणात पाणी भरले. नालेसफाई योग्य झाली असती तर पाणी भरले नसते असे रहिवाशांचं म्हणणं आहे.


टॅक्सी-रिक्षा चालकांचा संप 


इतक्या पावसानं नेहमीप्रमाणे हिंदमाता भागात पाणी साचलंय. त्यातच रेल्वे सेवा विस्कळीत आणि टॅक्सी-रिक्षा चालकांचा संप यामुळे मुंबईकरांचे सकाळी हाल झालेत. गाड्या लेट अस्याने गर्दीतून घामाघूम प्रवास करावा लागत आहे. हार्बरवर ३० ते ४५ मिनिटे गाड्या लेट असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर १५ ते २० मिनिटे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ३० मिनिटे लेट आहे. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल झालेत.


स्थानकांवर प्रवाशांची गर्दी 


मध्य रेल्वेची वाहतूक अजुनही विस्कळीत आहे. विद्याविहार, ठाणे, विक्रोळी, भांडूप स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसन येत आहे. पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली तरी ती रुळावर येण्यास उशिर होत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीतच आहे. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे भायखळ्यापुढे लोकलच्या रांगा दिसून येत आहेत.


दोन तास गाड्यांची वाट


रात्रभर मुसळधार पाऊस पडलेला असला, तरी पहाटेपासून पाऊसाचा जोर असरल्यानं उपनगरातले प्रामुख्यानं कल्याण डोंबिवलीतले प्रवासी कामावर निघाले. पण स्टेशनवर आल्यावर मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या गाड्याच नसल्यानं स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे स्टेशन प्रवाशांच्या अशरशः पूर आला...अनेक ठिकाणी लोकांना दोन दोन तास गाड्यांची वाट बघावी लागली. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं गाड्यांची वाहतूक उशिरानं होत असल्याच्या घोषणा होत होत्या...पण पाऊस थांबला तरी पाणी ओसरत का नाही...असा प्रश्न प्रवाशांना सातवत होता.