मुंबई : भाजपाच्या महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष सामील झाला. त्यामुळं महाराष्ट्रात भाजपा युतीची ताकद वाढली असल्याचा दावा भाजपनं केलाय. विधानसभा निवडणुकांवेळीच भाजप महायुतीत सहभागी व्हायचं ठरलं होतं, मात्र काही कारणानं ते शक्य झालं नाही, असं विनय कोरेंनी म्हटलंय. 


कुठलीही अपेक्षा न ठेवता ही आघाडी केल्याचं विनय कोरेंनी म्हटलंय. शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळाला, तरच सामाजिक न्याय मिळेल, असंही कोरेंनी म्हटलंय. राज्यात दुधाचा एकच ब्रँड असावा, या कल्पनेला विनय कोरेंनी पाठिंबा दर्शवलाय.