मुंबई : शहरात गिरगाव आणि काळबादेवी येथून जाणा-या मेट्रो तीन प्रकल्पाच्या पत्र्यांवर अज्ञात लोकांनी काळे फासले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच मेट्रो तीन प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली आहे. मात्र या मेट्रो तीन प्रकल्पाला स्थानिक रहिवाश्यांचा कडाडून विरोध आहे. 


गिरगाव आणि काळबादेवी येथील मेट्रोच्या मार्गावर ११५ कुटुंब आणि  २५७ व्यापारी गाळ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही, असं असताना मेट्रोच्या कामाला सुरवात करण्यात आलीय. त्यामुळे स्थानिक रहीवाश्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.