मुंबई : शहरात ईस्टर्न हायवेवर भरधाव वेगामुळे झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या वरूण नायर यानं मुंबईत कुणाकडून तरी स्कोडा कार घेतली होती आणि तो मुलुंडहून ठाण्याला जात होता. फ्लायओव्हरवर चढताना त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि अनेक वेळा पलटी खात गाडी रस्त्यालगतच्या झाडांच्या पाठीमागे खड्ड्यात जाऊन पडली.


या अपघातात वरूण नायर याचा मृत्यू झाला. त्याला कारमधून काढणं अग्निशमन दलाच्या जवानांना अतिशय कठीण गेलं. या अपघातामुळे इस्ट्रर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम झाले होते.