मुंबई : मुंबईकर प्रवाशांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. २ ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या नव्या ४० फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती  रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेमंत्र्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिलीय. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गर्दीमुळे अनेक अपघात घडतात. या वाढीव फेऱ्यांमुळे लोकलची गर्दी कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल. 


यापूर्वीही लोकलवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी काही लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र ऐन वेळेस लोकल रद्द होण्याचे प्रमाणही वाढले आहे.