मुंबई : राज्यात सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना यापुढे 3 ऐवजी आता ५ वर्षांची कडक शिक्षा केली जाणार आहे. किमान २ ते कमाल ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होणार आहे. तसंच २५ हजाराचा दंडही करण्यात येणार आहे.


मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबधीत निर्णय घेण्यात आला. येत्या अधिवेशनात यासंबंधीच्या कायद्यात दुरूस्ती करण्यात येणार आहे. राज्यात २०११ पासून २५४९७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकारच्या गुन्ह्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता सरकारने शिक्षा कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.