मुंबई : भाजप आमदार परिचारक यांच्या वक्तव्यावर राज म्हणाले... 'एक एक वर्ष सैनिक बॉर्डरवर असतो, मग यांना मुलं कशी होतात, असं भाजप आमदार प्रशांत परिचारक म्हणाले होते, अशांना चौका चौकात चपलांनी  फोडून काढलं पाहिजे, अशी माणसं भाजपला का चालतात, भाजपला सर्व काही खपतंय, का खपवून घेतलं जातंय माहित नाही', असं राज ठाकरे म्हणाले.


या नाशिक शहरातील लोकांनी जो पायंडा पाडला आहे, तो त्यांनाच पुढे भयानक सहन करावा लागणार आहे, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतो,असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले, त्यांनी गुंड आणून आणून उभे केले आणि ते निवडूनही आले, अशी प्रतिक्रियाही यावेळी राज ठाकरे यांनी दिली.