मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या १०५ हुतात्म्यांचा भाजप-सेनेकडून अपमान झाल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी हुतात्मा स्मारक फुलांनी सजवलेलं असते. महाराष्ट्र शासन ते फुलांनी सजवते. यावर्षी एक फूल दिसत नाहिये. फुलाची एक माळ दिसत नाहिये. सरकारसाठी हे अत्यंत लाजिरवाणं अशा शब्दात ठाकरेंनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये. 


दुर्दैवाने बोलावे लागत आहे की नालायक भाजपवाल्यांपेक्षा कॉंग्रेसवाले परवडले. त्यांच्या काळात किमान हे सजवलेल असायचे किमान. महाराष्ट्राची फारकत घेण्याची भूमिका कधी नव्हती. आज हे चित्र दिसत आहे ते अत्यंत घाणेरडे आहे, असे ठाकरे पुढे म्हणाले.