मुंबई : नोटबंदीवरून पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या काँग्रेसने आज अखेर पातळी सोडली. काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी मेरा पंतप्रधान चोर है असा टॅटू गोंदवून घेतलाय. विशेष म्हणजे देशात लोकशाहीच्या मार्गाने निवडून दिलेल्या सरकारच्या पंतप्रधानांवर अशाप्रकारे टीका करत असतानाच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आपल्या कार्यकर्त्यांचे गोडवे गात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेतला होता. सर्जिकल स्ट्राईक हे फेक होते. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे दिले तरच त्यावर विश्वास बसेल असं निरुपम म्हणाले होते. पण निरुपम यांचं हे मत वैयक्तिक आहे, पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेसला द्यावं लागलं होतं.