मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. काळापैसा रोखण्याच्या लढाईत राष्ट्रवादी सरकारसोबत आहे, मात्र कोणत्याही तयारीविनाच नोटाबंदीचा निर्णय लागू केल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीमुळे शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाचं मोठं नुकसान झाल्याची टीकाही पवारांनी केली. प्रत्येक गोष्ट आपणच करत असल्याचा आव आणणं चुकीचं असल्याचा टोलाही पवारांनी मोदींना लगावला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.